Skip to content

बायकोच्या चेहऱ्यावर खरा आनंद पहायचा असेल तर तिला बंधनातून मुक्त करा.

स्त्री स्वतंत्र आहे का ??


अपर्णा कुलकर्णी-नानाजकर.


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारी माणसं असतात.प्रत्येक माणसाशी आपलं एक विशिष्ठ नातं असत.या नात्यांसाठी तर आपण जगत असतो.नातं कोणतही असो त्याचा आपल्या जगण्यात महत्त्वाचा भाग असतो.

कधी कोणाशी आपलं भांडणं झालं किंवा कोणाशी आपलं पटत नसेल तर आपला दिवस चांगला जात नाही.सतत झालेल्या वादाचा विचार आपण करत राहतो आणि मन उदास होऊन जातं.काय करावं म्हणजे वाद मिटून जातील यासाठी प्रयत्न करतो आपण.

प्रत्येक नात्याची एक वेगळी ओळख असते आणि प्रत्येक नातं विशेष बांधिलकी ने बांधलं गेलेलं असतं.कोणाचं आई सोबत,मित्र – मैत्रिणी सोबत,बाबांसोबत तर कोणाचं आपल्या नवऱ्या सोबत किंवा बायको सोबत.नात्याचे असे खास बंध जुळून आलेले असतात .हि बांधिलकी इतकी घट्ट होते की त्या नात्या शिवाय जगणं कठीण होऊन जातं.

जगण्याचा पाया च मुळात ही माणसं असतात.जी सतत कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत असतात.जगण्याचा,आयुष्याचा भाग होऊन गेलेले असतात.अशी माणसं ज्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी असते.

असच एक आयुष्यभर सोबत करणार नातं म्हणजे नवरा – बायको च नातं.

प्रत्येक च नात महत्वाचं आणि जीवाला जीव देणारे असते.पण नवरा – बायको च नातं हे आयुष्यभर सोबत करणारं,एकाच नाही तर सात जन्मांची साथ देणारं,जीवाला जीव देणारे अस नातं असत.

नवरा – बायकोच्या नात्यामध्ये विश्वास असावा,प्रेम असावं,संवाद असावा,मैत्री असावी,ओढ असावी, विचार स्वातंत्र्य असावं, एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असावी.

पण प्रत्येक नवरा – बायको च नातं अस असत का ?? प्रत्येक नात्यामध्ये समानता,आदर,प्रेम विश्वास,स्वातंत्र्य असते का ??

कसं असायला हवं नातं नवरा – बायको च???

कोणतही नात तयार व्हायला वेळ लागतो म्हणजे त्या नात्यामध्ये विश्वास,प्रेम या सगळ्या दृष्टीने नात घट्ट व्हायला वेळ लागतो. तसच ते नात टिकवायला सुद्धा मेहनत घ्यावी लागते.

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आजही बऱ्याच घरांमधे पुरुष म्हणतील तीच पूर्व दिशा असते.सगळ्या गोष्टींचे निर्णय पुरुष च घेतात.नवरे म्हणतील तसच बायकांना वागावं लागतं.बायकोचं अस्तित्व,विचार स्वातंत्र्य,निर्णय या बाबी लक्षात घेतल्या जात नाहीत.

अशा वेळी बायकोची घुसमट होते.मुलांची शिक्षणं,त्यांचं राहणीमान, खाणं पिणं इतकंच काय तर तिचं स्वतःच रोजचं आयुष्य जगण्याची सुद्धा मुभा तिला नसते.कधी तिला मैत्रिणी सोबत बाहेर जायचं असेल तर नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते.कधी जाणार, कधी येणार,काय काम आहे,जायलाच हवं का,बाहेर का भेटायचे आहे,घरीच का बोलावत नाहीस असे एक ना हजार प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागतात.

मालिका बघत असेल तर तिने घरातील सगळी कामे केली आहेत का हे बघितलं जातं आणि कामे उरकून जरी बायको टीव्ही समोर बसली असेल तरी मला बातम्या किंवा मॅच बघायची आहे काय रोज रोज मालिका बघतेस,उद्या तू घरीच आहेस ना.अस ऐकवलं जात.

मुलं काही चुकीचं वागत,बोलत असतील तर तुझ लक्ष कुठे असत.काय करत असतेस दिवसभर ,घरात बसून मुलांकडे लक्ष देता येत नाही का ?? हे ऐकाव लागतं.

कधी कोणत्या गोष्टीत बायको ने आपलं मत मांडलं तर तू मधे बोलू नकोस, यातलं तुला काय कळतंय ?? हे ऐकुन घ्यावं लागतं.

घरातल्या छोट्या मोठ्या चुकांसाठी बायकोलाच जबाबदार धरलं जातं.मग चूक मुलांची असो,सासू सासर्यांची असो नाहीतर कुटुंबातील बाकी सदस्यांची.

काही झालं तरी अगदी कामवाली बाई जरी आली नाही तरीही बायकोला च दोष दिला जातो.

पण काही चांगलं झालं तर सगळं श्रेय नवरा स्वता: कडे घेतो.म्हणजे उदाहरणार्थ मुलांना चांगले मार्क मिळाले तर मुलं माझ्यावर गेलेत अस म्हणून मोकळे होतात नवरे मंडळी पण या मागे रोज मागे लागून आपल्या बायको ने त्यांचा अभ्यास घेतलाय हे मान्य करणार नाहीत किंवा तिची पाठ थोपटत नाहीत.

घर हे दोघांचं असत,मुलं दोघांची असतात,घरातील माणसं दोघांची असतात मग जबाबदारी ही दोघांनी मिळून घ्यायला हवी ना.
घर म्हणल्यावर काही कमी जास्त होणारच,चुका होणारच. प्रत्येक गोष्टीसाठी बायकोला जबाबदार धरून कसं चालेल??

घरात लग्न करून आलेली ती व्स्त्री ही एक स्वतंत्र विचारांची,वेगळ्या वातावरणात राहिलेली एक व्यक्ती आहे जी तुमचा हात पकडुन,तुमच्या विश्वासावर पूर्ण आयुष्य तुमच्या सोबत तुमच्या माणसांसोबत तुमच्यासाठी जगणार असते.घरातील लक्ष्मी असते.तिला तिचं व्यक्ती स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य मिळायलाच हवं.

घरात मान,सन्मान,आदर मिळायलाच हवा. तिचं ही एक वेगळं आयुष्य असूच शकत.ज्या मध्ये तिच मित्र मंडळ,नातेवाईक,आई वडील,आवडी निवडी,छंद,कलागुण असतील.त्या सगळ्या गोष्टी जपण्याचा आणि करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे ज्यामुळे तिला आनंद मिळेल.

जर तुम्हाला तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावर खरा आनंद बघायचा असेल तर तिचं वेगळं अस्तित्व,स्वातंत्र्य मान्य करा. तिच्या कलागुणांना वाव द्या. तिला विचार मांडायला संधी द्या आणि त्यावर विचार करा. तिला धकातून कटकटीतून मोकळं करा. सगळ्या बंधनातून मोकळं करा. वेगळी ओळख निर्माण करू द्या.मोकळे पणाने जगू द्या.तिचा छान मित्र बना. जास्तीत जास्त वेळ द्या. बायकोला समजून घ्या. तिच्या आनंदात सहभागी व्हा. तिला तिच्या मनासारखं जगू द्या. तिचे दोष दाखवत बसण्यापेक्षा चांगल्या गुणांची कदर करा.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!