आताशा मला जमायला लागलंय………
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे मला दुखवत गेले त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं आताशा मला जमायला लागलयं…….
संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय..
माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून त्यात शक्ती खर्ची घालून आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्या कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय हे ही जाणवायला लागलयं….
आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आताशा जमायला लागलय….
कोणत्याही न पटणार्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही,
कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं…खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं हे ही कळायला लागलंय …..
आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण आपण स्वतःच्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्त्व द्यायचं , त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवून ठेवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं का हे ठरवणं गरजेचं असतं.
हे ही कळायला लागलंय……..
कधीकधी परिस्थितीला आहे तसंच सोडून देणं आणि शांत राहणं सोईचं ठरतं. लोकांना कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळट पणाचं आहे हे कळल्यावर मी आताशा मला त्या दृष्टीनं घडवायला लागलीय ….
मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षांने शोध घेत होते ती मनःशांती, समाधान मला मिळालं तेंव्हा ठरवलं की मी अशा लोकांपासून लांब राहावे , ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला त्यांच्या साच्यात बसवणे शक्य नाही.
सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात .
तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणार्या, वरवर संबंध ठेवणार्या, लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलंय….
माझ्या स्वतः च्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं आणि उशीरा का होईना पण मी आताशा त्या वाटेवर समाधानानं पावलं टाकायला लागलोय…….
आत्ताशा मला समजायला लागलयं ….
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
आतिशय अप्रतीम लेख …खुपच सुंदर ..
खुप छान
Khup Chan
एखाद्याचे आयुष्य समाधानी करण्याचे योग्य साधना केंद्र म्हणजे आपले मानसशास्त्र
जवळपास सर्वांच्याच आयुष्यात अशा घटना घडतात मी कित्येक घरात वादविवादात मध्यस्थी करून बर्याच कुटुंबातील समस्या सहज गोड बोलुन सोडवल्या.. पण माणसा सारखी खोटं बोलणारी स्वार्थासाठी शब्द बदलणारी जमात आहे.तो पर्यंत भांडणं झाली की घराबाहेर पडायचं.अतिशय उत्तोमत्तोम लेख पोस्ट