Skip to content

आयुष्यात समाधानी रहायचं असेल तर…

आयुष्यात समाधानी रहायचं असेल तर…


सौं सुरेखा अद्वैत पाटील.

पाचोरा.


आयुष्यात समाधानी रहायचे असेल तर व दुसऱ्याला आनंदी ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा ! आणी आत्मसात करा.. काळाची पावलं ओळखा !आणी त्या अनुषंगाने प्रगतीकडे घोडदौड करा. प्रगती होईल.

भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिका. .आपल्यातलं चांगलं दुसऱ्याशी द्यावं व दुसऱ्यातील चांगलं आपणही घ्यावं..

काहीही झाले तरी नेहमीच स्वतःशी प्रामाणिक रहा.जो स्वतः प्रामाणिक तो इतरांसी प्रामाणिक….

प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करायाला शिका कारण आपली नेहमी तक्रार असते की वेळ नाही पण आपण हे बोलण्यातही आयुष्याचा क्षणन्क्षण दुःखात घालवतो….

भरपूर वाचन करून विचारशक्ती वाढवा,नवी पुस्तके वाचा.व लिहिते व्हा. लिहायला लागलात म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यासही वाचायला शिकाल.

शक्य तेवढ्या लोकांना मदत करा. ज्यांनी आपणास मदत केलीय. त्यांची होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करुया.

रागावर नियंत्रण ठेवा राग आयुष्यात जास्त असेल तर आपलंच नुकसान होते.रागावर नियंत्रण म्हणजे स्वतःला जिंकणं.. कुणाला दुखावू नका. कुणाच्या मदतीला नाहीं गेलं तरी चालेल पण दुसऱ्यांच मन सांभाळून घ्या. माझं माझं करून.. शेवटी एकेदिवशी आपला मुक्काम हलणार आहें. याची जाणीव ठेवा..

व्यायाम करुयात …तसेच संतुलित आहार, आणि शांत झोप सोबतच ध्यानधारणा..

स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करा…अपेक्षा केल्यामुळे दुःख होते.त्यापेक्षा निरपेक्ष जगा. प्रयत्न करा…आणि पुढे जात रहा….आपल्या मायेच्या माणसांना जपा त्यांचा आदर करा. विश्वास कायम ठेवा…स्वतःवर आणि निसर्गावरही….आणी समोरच्या वर.

आपल्यामुळे कुणाला दुखावू नका..होता होईल तेवढं प्रेमानं वागा.. व दुसऱ्याच्या गुणांचं तोंडभरून कौतुक करा. काय सांगावं तोंडभरून कौतुक करणारा व्यक्ती म्हणून तुमची स्वओळख निर्माण होईल.

बोलतांना नेहमी समोरच्याचा विचार करत जा.त्यांना ही मन आणी भावना असतातच आपल्यासारख्याच. दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा आपण कसं चांगलं वागू शकतो ते ठरवा..

कोणत्याही प्रकारची बळजबरी, तणाव सहन करू नका.व दुसऱ्या वर पण लादू नका. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.आपण आयुष्यभर विद्यार्थी असावं.

लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा,त्यांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करा.दुसऱ्याचं दुःख समजून त्याच्या पाठी उभं राहा. स्वार्था पोटी कुणाशीही नाते जोडू नका..

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका.दृष्टी बदला .सारी सृष्टी बदलताना दिसेल.

प्रत्येक गोष्ट बदलत राहते म्हणून सुख दुःख यापलीकडे जाऊन विचार करा….

शिस्त ही माणसाची महत्वाची गरज असते,कधीकधी आपण सकारात्मक नसतो पण शिस्तबद्ध असू तर वेळ बरोबर मारून नेऊ शकतो….पण होता होईल तेवढं सर्वासाठी सकारात्मकता ठेवा.
वेळेचा आदर करा…सोबतच सर्वांचा देखील आदर करा .एकदा गेलेली वेळ परत येत नसते.पण वेळेत जमलं ते जमलं.. नेहमी जमिनीवर राहा. कारण हवेत गेलं म्हणजे हवा ही कधीकाळी फूस होणार!
रोज लिहिण्याचा प्रयत्न करा, आपले विचार कुठेतरी मांडलेत की मन मोकळं होतं….आणी विचारांना कृतीची जोड देखील मिळते.
भावनिक राहू नका, नेहमी प्रॅक्टिकल रहा….रात गयी बात गयी असे वागा.

या जगात कुणीच परिपूर्ण नाहीय.. , आणि परिपूर्णते साठी धावू ही नका., स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा . ह्याचा अर्थ असा नाही की बदलन्याचा प्रयत्न करू नका….बदल नक्कीच करा पण अपेक्षा ठेवू नका…निरपेक्ष राहा सुखी नकीच होऊ…. जुने जाऊद्या पण जुन्यातल सोनं व्हा.. आणी सोन्यासारख्या माणसांना आपलंस करा ?. सुखी व्हा.

सुख पेराल तर सुखाची पालवी नक्कीच फुलेल..


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!