Skip to content

अतिसुखात आनंद आहे का??

अतिसुखात आनंद आहे का?


सौ.सुलभा घोरपडे


जीवनाच्या प्रवासात पावलोपाऊली सुख असते पण त्याचा जर अतिरेक झाला तर दुःख वाट्याला येते . आपल्या अवतीभवतीच सुख असते पण अतिसुखाच्या हव्यासापायी निसटून गेलेले असते…

तहान लागली पाण्याचा पहिला घोट किती सुख देतो !, भूक लागली तर , जो पहिला घास मिळतो तेव्हा किती सुख वाटते ! उकडत असताना वार्याची झुळूक किती सुख देते! म्हणजे सुरूवातीला या गोष्टी सुख देतात पण नंतर नंतर याच गोष्टीतील सुख कमी होते पोट भरते पण पुढे तसेच खाणे , पिणे वगैरे चालू ठेवले तर वेदना होऊन दुःख होते किंबहुना आपण चालू ठेवू शकत नाही

आपल्या आयुष्यातील लग्न हे सुखाचे क्षण कोण विसरू शकते ? पुढे पोटात वाढणार बाळ, बाळाचा जन्म, त्याच हसण, खिदळण, दुडुदुडु चालणारी पावलं , विश्वासानी धरलेल बोट आणि बघता बघता स्वावलंबी झालेला तरूण किंवा तरूणी यांच्याकडे पाहताना सुख समाधानाने कंठ भरून येतो .

पण त्याच गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर दुःख .

जीवनातील एखाद्या अवस्थेत जास्त वेळ रेंगाळलो तर त्यातील सुखाच प्रमाण कमी होते . जसे – लहानपणीचे खेळ तारूण्यात बालिश वाटतात.

तीशीनंतर तारूण्यातल्या त्या गुलुगुलु गप्पा अर्थहीन वाटतात.

योग्य वयात योग्य गोष्टी झाल्यावर सर्वात जास्त सुख मिळते .

अतिसुखातून सुद्धा आनंद मिळत नाही .जास्त मार्क्स मिळवण्याच्या धडपडीत बालपण हरवल जाते . तारूण्यात लैंगिक संबंधात आनंद शोधता शोधता , याचा उद्देश प्रजोत्पादन हा आहे हे विसरल जाते. मनुष्याने या भावनेला अवास्तव महत्त्व दिले आहे. त्यात पाप घुसवून ठेवले . ज्याच्यात लैंगिक भावना कमी आहे तो सात्त्विक आणि ज्याच्यात जास्त तो तामसिक वृत्तीचा.समाजाने या भावनेला अवास्तव महत्त्व दिल्याने त्याच्याबद्दल आकर्षण व कुतुहल वाढते आणि त्यात इतके गूढ आणून ठेवल्याने त्यातच आनंद असावा अशी चुकीची समजूत.

उच्चभ्रू समाजात तर या पार्टनरमध्ये आनंद नाही म्हणून वेगवेगळे पार्टनर बदलने. जोरजबरदस्ती करणे किंवा त्याच प्रदर्शन मांडणे. अशी उदाहरणे पहायला ऐकायला मिळतात.

लग्न केल्यानंतर enjoy म्हणून किंवा करियर म्हणून मुल होऊ न देणे किंवा उशीरा होऊ देणे .

खरंच या सर्व खटाटोपात किती सुख आनंद मिळाला?

कोण खाण्यात आनंद शोधतो मग अतिखाण्याने स्थूलपणा , बद्धकोष्टता असे आजार वाढतात तर कोण मद्यपानात आनंद मानतो त्याचे दुष्परिणाम तर सर्वांना माहिती आहेत तर कोण आराम करण्यात आनंद शोधतो मग मरगळ वाढते , आयुष्य बोअर होते .

म्हणजे काय अतिसुख शोधण्यासाठीच्या नादात मनुष्याच्या पुढ्यातल सुख दुर्लक्षित होऊन दुःख वाट्याला येते…

असेही म्हणतात” अति तेथे माती”.किंवा एक संस्कृत सुभाषित आहे. ” अति सर्वत्र वर्ज्ययेत ” म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!