Skip to content

अवतीभवती असेही लोक असतात जे आपल्याला केवळ दाखवण्यापुरते आपले असतात.

अवतीभवती असेही लोक असतात जे आपल्याला केवळ दाखवण्यापुरते आपले असतात.


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


आपल्या जीवनात बऱ्याचदा अशा लोकांशी आपला संपर्क येतो जे खरंच आपले आहेत , त्यांना आपली फार काळजी आहे असे ते वागतात . आपल्याला ही माणसं जवळची वाटू लागतात . पण जेव्हा संकट येतं , तेव्हा हीच माणसे पहिला पळ काढतात आणि तेव्हा आपल्याला त्यांचा खरा चेहरा कळतो. आता ते असे का वागतात ? आपले नसताना आपलं असण्याचा आव का आणतात ? असा प्रश्न पडतो . पण याच उत्तर फार सोप्पं आहे पण तसं logical आहे असं नाही .

सर्व माणसांच्या good books मध्ये राहण्यासाठी तसं वागण्याची या माणसांची सवय असते . म्हणजे जेव्हा ही माणसं तुम्हांला भासवतात की , ते तुमचे आपले आहेत , तुमची काळजी करतात आणि तुमचे हितचिंतक आहेत तेव्हा अशी माणसे नक्कीच कोणालाही चांगलीच वाटणार ! या हेतूमुळे ही माणसे दिखावा करतात . हीच ती माणसं असतात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्यांना मनातलं सांगता आणि ही माणसं तुमची गुपितं ,तुमचे प्रॉब्लेम्स दुसऱ्या कोणाला जाऊन बोलत असतात . तुमच्या चुका परखडपणे तुम्हांला सांगण्यापेक्षा तुमच्या मागे बोलायला त्यांना जास्त आवडतं . इंग्लिश मध्ये एक म्हण आहे , it’s better to rise alone , then to be accompanied by the wrong people.

ही fake माणसं ओळखणं तसं अवघड ही असतं आणि सोप्पं ही ! जर नीट लक्ष त्यांच्या कृतीकडे , शब्दांकडे दिलं असता काही वेळा तरी अशी माणसं लक्षात येतात . पण सगळ्यात मुख्य म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात हेच लक्ष देणं , ते लक्ष द्यायचं हे सुद्धा वेळच्या वेळी लक्षात येणं आपल्याला अवघड असतं . इथे कितीही विचार केला तरी आपल्या आयुष्याला पुरतील एवढे योग्य विचार आपल्या कडून होत नाहीत तर दुसऱ्या माणसांच्या वागण्यावर , बोलण्यावर आपण कितीसं असं लक्ष देणार ? असं तुम्हांला वाटणं साहजिक आहे . आणि हे खर देखील आहे . पण तरीदेखील काही कटू अनुभवांपासून स्वतः ला वाचवायचं असेल , कोणी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला एवढी precaution तर नक्कीच घ्यावी लागेल .

कोणीही कितीही सहानुभूती दाखवली तरी लगेच विश्वास ठेवून सगळं सांगू नकात . याचा अर्थ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घ्या असं नाही परंतू प्रचिती येईपर्यंत काही दिवस neutral रहा. कारण ‘आपली माणसं ‘ असण्याच नाटक करण्याचा हेतू असलेल्या माणसांचा त्यामागे काय हेतू असू शकतो हे आपल्याला सांगता येणार नाही .

खरं सांगायचं तर अशा माणसांच्या सहवासात असताना चुकूनही तुम्हांला असं वाटणार नाही की तो माणूस fake आहे , कारण तशी VIP treatment तो माणूस तुम्हाला देत असतो , आणि एवढं चांगलं कोणी आपल्याशी वागत असेल तर कधी ना कधी विश्वास बसणारच !

१. तुमच्या गोष्टी , मतं ऐकून ही मंडळी तुम्हांला मनातल्या मनात भरपूर judge करत असतात , जरी त्यांनी तुम्हांला समोर तसं दाखवलं नसलं तरी .

२. खूप लवकर ही माणसं आपल्या जवळ येतात , खूपच कमी वेळात आपलीशी वाटू लागतात .मला असं म्हणायचं नाहीये की , कमी वेळात जवळ येणारी माणसं वाईटच असतात पण सगळीच चांगली सुद्धा नसतात . इथे आपल्याला वाईट माणसांपासून सावधता बाळगायची गरज आहे .

३. सतत प्रचंड स्तुती करणे .

४. VIP treatment देणे .

५. तुम्ही त्यांचे सगळ्यात favourite आहात असं feel करवतात .

पण हे सगळं करण्यामागे त्यांचा काही ‘छुपा’ हेतु असू शकतो . नम्र माणसे आणि fake माणसे यांत फार फरक असतो . कारण नम्र माणसेही यातल्या काही गोष्टी करतात पण निरीक्षण केलं असता त्यातला फरक जाणवतो . जर चुकून तुमच्यात कधी मतभेद झाले तर ही माणसे तुमचे secrets इतरांना सांगायलाही कमी करत नाहीत .


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!