Skip to content

प्रेम करा, पण तुमच्या हृदयाशी कुणाला खेळू देऊ नका!

प्रेम ,सौंदर्य हे …शाप कि वरदान ?


सौ.सविता दरेकर
चांदवड,नाशिक


“प्रेम करा पण तुमच्या हृदयाशी कुणाला खेळू देवू नका” असं वाक्य एका स्टेटसला वाचण्यात आलं आणि मनाला भावताच त्यावर लिहावसंच वाटलं…

भर चौकात रहदारीची गंमत बघत सीमा तीन तासापासून कुणाची तरी वाट बघत होती..अंधार होत आला तरीही तिचा प्रभाकर अजून आला नव्हता..

नवीनवी मैत्री आणि मग प्रेमातून दोघांनाही भेटीची ओढ लागलेली होती…काँलेजात जाणारी सीमा घरी मैत्रीणकडे बड्डेपार्टीला जातेय सांगून पाच वाजताच आली होती….प्रभाकरचा कतृत्वसंपन्न जिद्दीचा संघर्षाचा प्रवास सीमाला भावला होता तर सीमाचे सौदंर्य ,निर्मळ मन,खळखळून हसणे बोलणे त्याला भावले होते.

पण खूप वेळ झाल्याने आता सीमाचा रागाचा पारा चढला ती फोनवर फोन करत होती येतो अर्धाच तास गं कामात अडकलोय ,ट्राफीकमधे अडकलोय असेच उत्तर तिला मिळत होते…

पण तरीही तिला आस होती प्रभाकरची भेट घेतल्याशिवाय तीला परत जाणे मान्य नव्हते..पण चौहूबाजूने अनेक संशयी नजराही तिच्यावर खिळल्या होत्या..पण सारं बळ एकवटून ती प्रभाकरची वाट पहात होती..

” अखेर त्याची गाडी पोहचली आणि तिच्या जीवात जीव आला…त्याला बघताच तिचा सारा राग विरघळून गेला …त्यानेही साँरी म्हणत जणू तिला सुरक्षाकवचासह प्रेमाचा विश्वास दिला होता”…मात्र या भेटीनंतर महिना उलटला तरी प्रभाकर फिरकला नाही त्याने सीमाशी बोलायला, टाळायला सुरुवात केली..फोन उचलेना संवाद होईना सीमाच्या मनात ना ना शंका घर करु लागल्या…तरीही तिला विश्वास होताच प्रभाकर भेटेन..!

पण हे प्रेम कायम टिकेन का? नेहमीच प्रभाकर असा उशीर,कामातच वेळ देणार असेल तर सीमाने समजून घेत नेहमी वाट बघायचीच भुमिका घ्यायची का?तिच्या मनभावनांचाही प्रभाकरने आदर ठेवत विचार केला पाहीजेच ना? तिचा स्वाभिमान दुःखावला गेला तर नैराश्य साथ देते…याची झळ कुटुंब ,समाज,स्वकतृत्व सर्वानाच बसते….
काय वाटते यावर …! हे असे किती प्रभाकर आणि सीमा आपल्याला समाजात पहायला भेटत असतात…

पण काय असते खरे प्रेम आणि त्यातील व्याकुळता ? काय असते तनमनाची सुंदरता ? कि फक्त आभास असतो आकर्षणाचा ? तर कधी एखादा करतो विचार … प्रेमात जीवही देण्याघेण्याचा ? एखादी सुंदर असली मग हा काय तिचा दोष म्हणावा का ? जेव्हा तिच्यावर सतत खिळणाऱ्या नजरांचा तिला सामना करावा लागतो ,तेव्हा तिला सौंदर्य शाप वाटू लागते….!

प्रेमाच्या नगरीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करताना का विसरले जाते भान आणि त्यातील दाहकता…जेव्हा कधीकधी एकतर्फी विकृतीतून बळी पडतात अनेक रिंकू पाटील,अँसिडहमल्यात बळी पडलेल्या निरागस कुमारिका…! तर कधी नकार पचवताना बळी जातो एखाद्या युवकाचा…! कधीकधी मानप्रतिष्ठासाठी समाजच बळी घेतो दोन प्रेमींचा ? जीव जन्माला घालणे मानवाच्या हातात आहे पण कुणाला जीवे मारण्याचा अधिकार मानवाला दिलेला नाही तरीही कधीकधी हे क्रुरकर्म मानवच करतोय आणि असं करताना त्याच्या आतलं हृदय कुठे हरवते हा प्रश्नच? अजुनही सतत समाजात कुठेनाकुठे घडणारं धगधगतं वास्तव आहे हे ….मन पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांची सतत वाढ होताना दिसतेय…

वर्तमानपत्र ,सोशल मिडीया,भोवतालच्या घटनातून झळकणाऱ्या बातम्या वाचताना जाणवते कि प्रेमभंग,ब्रेकअप ह्या समस्यांनी तर कळसच गाठलाय आजच्या वास्तवात…! युवा पिढीच नाही तर विवाहीतही सुखशांतीच्या शोधात वैयक्तिक ,कौटुंबिक समस्यामुळे अडकताय या भोवऱ्यात .या समस्येचे मूळ खरं तर हृदयातच जोडले गेलेय म्हणून हृदयावर वैचारीकतेतून मेंदुचे नियंत्रण हवेच…

“हृदयभावना जुळून ,वैचारीकता जपत,कुणाचेही नुकसान न करता न दुःखवता निस्वार्थीपणे सहजीवनात गुणदोषासह जेव्हा फक्त, दोन मनं एकत्र येतात सुख दुःखात साथ देतात शेवटपर्यत … कदाचित हेच शाप नव्हे तर दैवी वरदान असावं खरं प्रेम”….!


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!